ब्रेकिंग न्यूज

*परतीच्या पावसामुळे मांजरा धरण भरल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सूर* *नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा*

अंबाजोगाई ( प्रतिनिधी):- बीड, लातूर व धाराशिव या तीनही जिल्ह्याची जलवाहिनी असलेले मांजरा धरण परतीच्या पावसाने पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडून मांजरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याने मांजरा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा शाखा अभियंता सूरज निकम यांनी नदीकाठच्या गावकरी व शेतकऱ्यांना दिला आहे. बीड, लातुर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ९६ टक्क्यांहून अधिक पाणी साठि जमा झाला असून नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग धरणात जमा होतो आहे. अशा परिस्थितीत मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे दरवाजे वक्र दरवाजे देखील उघडले असल्याने तेथूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडून धरणातील पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क रहावे असा इशारा मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणा-या कार्यकारी अभियंता, लातुर पाटबंधारे विभाग क्र. १, या कार्यालयाच्या वतीने जा. क्र.2024/आ.व्य/कावि-२७२ दिनांक: २४ सप्टेंबर २०२४ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुढे सांगितले आहे की, मांजरा प्रकल्पाचा पाणीसाठा हा ९६%पेक्षा जास्त झाला आहे तसेच निम्न तेरणा प्रकल्पाचा पाणीसाठा देखील तेवढ्याच प्रमाणात झाला आहे. धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील कॅचमेंट क्षेत्रातील पर्जन्यमान विचारात घेता प्रकल्पामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून प्रकल्प कधीही त्याची निर्धारीत पातळी पार करून पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. तथापि प्रकल्पाच्या आजूबाजूस असलेल्या ब्रीज द्वारे सुरळीतपणे पूर नियंत्रण राबविणेसाठी व मोठ्या प्रकल्पात अचानक येणारी आवक पाहता आवश्यक वॉटर पॉकेट तयार करून ठेवणे गरजेचे आहे. या सर्व बाबीचा विचार करता परिस्थितीनुसार मांजरा व निम्न तेरणा प्रकल्पांची दारे उघडन्याची आवश्यकता भासनार असल्याचे कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्र. १ लातूर यांनी कळविले आहे.
धरणाचे दरवाजे उघडपणे मांजरा व निम्न तेरणा नदीकाठच्या गावाना शेतक-यांना नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या वेळी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवून दर तासानी पडणा-या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास द्यावा व सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी पुढील खबरदारी घेण्याचे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे ज्यामध्ये १) दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ, विद्युत खांचाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. २) आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. ३) जलसाठ्‌याजवळ, नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्‌यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, ४) पुलावरून नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किवा चाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. ५) पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. ६) पाउस सुरु असताना विजेच्या तारा जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. कोणतीही दुर्घटना घडल्यास पोलीस अधिकारी / तलाठी / मंडळ अधिकारी/ ग्रामसेवक / सरपंच कृषी सहाय्यक याना तात्काळ माहिती द्यावी असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!